Friday, December 17, 2021

विचार जिवंत पाहीजे


       जीवन जगताना आपण आपल्याच माणसांपासून दूर जातो, का ? कशासाठी? आजच्या धकाधकीच्या काळात माणूस माणूसपण विसरला आहे, किंबहूना माणूसकीच सोंग घेऊन माणूसपण दाखवतं आहे. 
       तरीही जीवन जगताना काही भूतकाळातील चांगल्या गोष्टी विसरून चालणार नाही कारण काही वेळेस भूतकाळाचं भविष्यकाळ घडवण्याचे धडे देतं असतो, जसा इतिहास वाचून छाती गर्वाने फुगून येते अगदी तसच वर्तमान सुध्दा अभिमानाने जगलो पाहीजे. 
           समाज बांधिलकीच्या माध्यमातून विचार केला तर माणूस अजून ही समाजाच्या चौकटीत अडकलाय, जोपर्यंत ही चौकट तुटत नाही किंवा नाहीशी होतं नाही तोपर्यंत सर्वधर्म समभावाच्या गोष्टी करणं निरर्थक आहे, वाईट व गंजलेल्या विचारांचा नाश झाला पाहीजे, नाहीतर हेच विचार देशाला घातक ठरू शकता. आधी माणूस जागा झाला पाहीजे तेव्हाच क्रांती घडेल, पण तरीही माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही त्याला क्रांतीकारी बनवं लागतं त्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे.
     कोणती संस्कृती जपतो आहोत आम्ही, आजही दाभोलकर, पानसरे अशा अनेक विचारवंतांच्या भर रस्त्यावर हत्या होता, मारेकरी फक्त व्यक्तींची हत्या करू शकता त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवालेल्या विचारांची नाही, इतिहास साक्षी आहे आम्ही समाज सुधारकांना जगू दिले नाही आणि नंतर त्यांच्या विचारांशिवाय आम्ही जगू शकत नाही, स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचीच प्रेत यात्रा बघणारे आगरकरांना आम्ही कसं विसरू शकतो, आम्ही फक्त महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो पण महासत्ता होण्यासाठी आम्ही करतो तरी काय ? नुसतं बोलून काही होणार नाही तर ते कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व अशा अनेक विचारवंतांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे तर आणि तरच आपण जगाच्या पाठीवर आपली ओळख ठामपणे करू शकतो.
                                        -विलास खैरनार 

   

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...