कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता
विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता
गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार
मनात पडलेला
भावनांचा सडा
कळत नकळत
मंतरलेल्या क्षणांची
संवेदनांच्या डोहात वलये
निर्माण करतात
मग वाटत
पकडावा शब्दांचा हात
जावं स्मृतीच्या घरट्यात
अन्
घ्यावा विसावा वेदनांसमवेत
- विलास खैरनार
तुला बरंच काही सांगायच होत
पण नंतर आपली भेट झालीच नाही
मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात
अखेरच तुला भेटण्यासाठी
डोळे भरून बघण्यासाठी
पण तेव्हा तुझे डोळे पाणावलेले होते
म्हणून पाय माझे जागीच थांबले होते
डोळे माझे रडून सुकले होते
कारण तेही सुन्न झाले होते
मला खरंच तिथे यायचे नव्हते
तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते
पण तुला दिलेलं वचन मला मोडायचे नव्हते
आणि तु दूर जाताना मला बघायचे नव्हते
तसाच काळजावर दगड ठेवून
दगडासारखा उभा होतो
अखेरच डोळे भरून तुला बघत होतो
- विलास खैरनार
तु, पाऊस आणि कविता
अशांत मन माझं
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...