Sunday, September 25, 2022

कविता

एकदा रस्त्याने फिरता फिरता
ती मला भेटली,
मला म्हणाली,
काय, ओळखलं का मला ?
मी म्हटलं, नाही
अहो, खरंच नाही ओळखल का?
मी म्हटलं, नाही
मी तर नेहमीच तुमच्या सोबत असते
सदैव तुमच्या ह्दयात जागणारी
तुमच्या मनातलं ओळखणारी
मनातलं ओठांवर आणणारी
शब्दांला शब्द जोडणारी
शब्दांला नवा अर्थ लावणारी
भावनांना जागवणारी
सुखात हसवणारी
दुःखाला लपवणारी
यशाकडे कटाक्षाने पहाणारी
अहो, मी कविता,
निघाली आहे,
नवे शब्द शोधत,
शब्दांच्या विश्वात,
तुमच्या सोबत.

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...