Sunday, October 6, 2024

गप्पा


गप्पा रंगल्या की
माणसं हरवून जाता
जुन्या गोष्टीं
उगीचच रंगवत बसता
गप्पा कशाही असल्या तरी
त्या फक्त भुतकाळ सांगता
भविष्याचा तर्क लावत
वर्तमान चिटकवत बसता
गप्पा सुध्दा माणसाचं
व्यक्तीमत्वा सोबत वय दर्शवता
काही तर फक्त चारचौघांत
गप्पा मारून हुशारी दाखवत बसता
गप्पा मारणं चुकीचं नाही
पण त्याला सुद्धा मर्यादा असता
काही तर म्हणे फक्त
"काम सोडून खांबच रगडता"
गप्पा या मनोरंजनासाठी करता
की एखाद्या व्यक्तीची निंदा करता
केव्हा काही चांगल्या कामासाठी करता 
हे त्या गप्पाच्या विषयावर सोडता
गप्पा त्या शेवटी गप्पाच असता


No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...