तुला बरंच काही सांगायच होत
पण नंतर आपली भेट झालीच नाही
मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात
अखेरच तुला भेटण्यासाठी
डोळे भरून बघण्यासाठी
पण तेव्हा तुझे डोळे पाणावलेले होते
म्हणून पाय माझे जागीच थांबले होते
डोळे माझे रडून सुकले होते
कारण तेही सुन्न झाले होते
मला खरंच तिथे यायचे नव्हते
तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते
पण तुला दिलेलं वचन मला मोडायचे नव्हते
आणि तु दूर जाताना मला बघायचे नव्हते
तसाच काळजावर दगड ठेवून
दगडासारखा उभा होतो
अखेरच डोळे भरून तुला बघत होतो
- विलास खैरनार
Sunday, October 13, 2024
तुला बरंच काही सांगायच होत
Subscribe to:
Post Comments (Atom)
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
-
- विलास खैरनार भाजपच्या १०५ आमदारांना माहिती आहे , पार दिल्लीत बसलेल्या मोदी शहाणा पण माहिती आहे भाजपवाले सध्या शिंदेंना ढिल देत आहेत,...
-
- विलास खैरनार कॉलेज मधून धावपळ करत मी बस स्थानकावर पोहोचलो तर कळलं की गाडी एक तास उशिरा येणार आहे म्हणजे दुपारच्या एक ...
-
तिचा प्रत्येक शब्द मला खरा वाटला स्वप्नात मी तिच्यासोबत संसार मांडला पण एकदा जवळ येऊन ती हळूच म्हणाली विसर वेड्या मी तर सहज टाईमपास केला अन...
No comments:
Post a Comment