Sunday, October 13, 2024

वेदना


रान सारे पेटले
आसरा कुठे घेऊ
धगधगत्या आगेला
कवेत कसे घेऊ

फाटलेल्या ढगाला
कसे ठिगळं लावू
आभाळा एवढ्या वेदना
कुठे झाकुन ठेऊ

साचलेले दुःख
कसे व्यक्त करू
पेटलेल्या मनाला
कसे शांत करू

खंत फक्त हीच की
सुखाला जागाच नाही
मनावरच्या जखमांना
कुठेच सहारा नाही

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...