Sunday, October 6, 2024

जात-धर्म

 

फाळणीच्या वेळी
देशावरच घात झाला,
कोणी ईश्वराचा झाला,
कोणी अल्लाचा झाला,

नंतर.....!
धर्माच्या नावाखाली संपूर्ण देश जाळला,
भर रस्त्यावर राम रहीम लढतांना पाहिला,

जिथे काल एकोप्याने रहात होते,
तिथेच आज दंगली झाल्या,
अहिंसाचा संदेश देणा-या
गांधी चौकात खुले आम कत्तली झाल्या,

विषय नितीमत्तेचा आहे,
कोणा धर्माचा नाही,
"हम सब भाई भाई" असं
म्हणण्याचा काळ उरला नाही,
पुढा-यांनी बंधुमधला भाव
आता ठेवला नाही,

तुम्ही सुद्धा बघत होता,
राम मंदिराच्या पायथ्याशी रहीम
मोठ्या आनंदाने खेळत होता,

जात - धर्म माणसाच्या काळजात असली,
तरी जाणीव राजकीय भाषणातून मिळाली,
सत्तेच्या हव्यासा पायी समाजात
जातीची जाळं टाकली,

मातीचा रंग एक
रक्ताचा रंग एक
मग झेंड्याचा रंग वेगळा कसा,
तुच सांग भारत माते,
एकात्मतेचा विषय फक्त
पुस्तकांच्या पानांमध्येच कसा?

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...