Sunday, October 6, 2024

महायुतीमध्ये बंडखोरी होणार...!


- विलास खैरनार

भाजपच्या १०५ आमदारांना माहिती आहे , पार दिल्लीत बसलेल्या मोदी शहाणा पण माहिती आहे भाजपवाले सध्या शिंदेंना ढिल देत आहेत, कारण विधानसभेत पराभव झाल्यावर त्याचे सगळं खापर शिंदेंच्या डोक्यावर टाकायचं आणि हळूच शिंदेंच्या कानात सांगायचं तुमचा उपयोग आता संपला आहे आता तुम्ही बाजूला व्हा,
जोपर्यंत एखाद्याचा उपयोग आहे तोपर्यंत भाजप त्याला खांद्यावर घेऊन मिरवतो आणि एकदा का उपयोग संपला की त्याचा किरीट सोमय्या करून कचऱ्याच्या डब्यात टाकतो,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे मुख्यमंत्री पद आलं तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते असे म्हणाले की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहे याचा अर्थ असा होतो की आता जरी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला देवेंद्र फडणीसच मुख्यमंत्री हवेत देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे अजून त्यांना अडीच वर्षानंतर सुद्धा पचत नाहीये,
शिंदे यांचे सहकारी मंत्री जे व्यवहार करतात तेही आरएसएसला मंजूर नाही अनेक घोटाळ्यांमध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची नावे घेतली जातात, तशी भाजपाच्या मंत्र्यांची येऊ नये अशी ताकीद आरएसएस नेत्यांनी भाजपला दिलेली आहे म्हणजे यावरून आरएसएसच्या नेत्यांचं शिंदे बद्दल काय मत आहे ते बघा पण भारतीय जनता पक्ष काही गप्प बसलेला नाहीये शिंदेंच्या प्रत्येक कृतीवर त्यांची नजर आहे आणि शिंदे जर अतिरेक करत असतील शिंदे जर भाजपवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या फुग्यातली हवा कशी काढायची हे भाजपच्या नेत्यांना बरोबर माहिती आहे,
अमित शहा शिंदेंना ढील देता याचं कारण शिंदेंचे आमदार वाढणं आणि उद्धव ठाकरे यांना मात देणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण शिंदे जर भाजपवर कुरगुडी करू लागले तर फडणवीस काय कोणीही ते मान्य करणार नाही,
त्यामुळे माझ्या मते एक तर भाजप योग्य वेळी शिंदेना धडा शिकवणार आहे, तुमचा उपयोग आम्हाला झालेला आहे आम्ही तो केलेला आहे आता तो संपलेला आहे आता तुम्ही बाजूला व्हा असा योग्य वेळी ते शिंदेंना सांगणार आहे आणि ती योग्य वेळ लवकरच येणार आहे अगदी निवडणुकीच्या आधी येणार आहे की निवडणुकीच्या नंतर येणारे एवढाच प्रश्न आहे.
निवडणुकीच्या नंतर जर महायुती हरली तर शिंदेंचा एकच उपयोग आहे की अपयशाची जबाबदारी शिंदे यांच्या डोक्यावर टाकता येईल जबाबदारी घेण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांची नाही अमित शहांची नाही आणि तुम्हाला गंमत सांगतो नितीन गडकरींकडे ही विचारणा करण्यात आली नितीन गडकरींचाही अंदाज घेण्यात आला की ते भाजपचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र तेथील कामगिरी नितीन गडकरींनी पूर्णपणे का झटकून टाकलेली आहे. कारण नितीन गडकरींना माहिती आता महाराष्ट्रात जाणं म्हणजे पायावर धोंडं पाडून घेणं आहे, त्यामुळे नितीन गडकरी जबाबदारी घ्यायला तयार नाही फडणवीसांकडे जबाबदारी नाही, त्यामुळे जर पराभव व्हायचा असेल तर तो शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे नेते असताना व्हावा असं भाजपाला वाटतंय म्हणजे सगळा दोष त्यांच्या आणि अजित पवार यांच्या गळ्यात टाकता येईल हे सरळ सरळ गणित आहे जर शिंदेला ३० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भाजपच्या दृष्टीने त्यांचा थोडाफार महत्त्व राहील.
तीस पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मात्र भाजप त्याला बाजूला करायला किंवा त्यांच्या ताकदी एवढी त्यांना तेवढेच त्यांना महत्त्व द्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या ही परिस्थिती आहे. त्यामुळे मी म्हणतोय की योग्य वेळी भाजप म्हणजे अमित शहा शिंदेंची विकेट काढल्याशिवाय राहणार नाहीत, भाजप असा हिशोब करतोय की जर समजा भाजप म्हणजे अगदी ६० - ७० जागा भाजपला मिळाल्याच तर भाजप नंबर एक राहील. भाजपच मोठा भाऊ राहील त्यामुळे आपण जे सांगू आपण जो आदेश देऊ तो शिंदेंना ऐकावा लागेल आणि योग्य वेळी बाजूला व्हावे लागेल,
भविष्यात महायुतीमध्ये बंडखोरी होणार आहे, अजित पवारांच्या डोक्यालाही चिंता नाही कारण त्यांचे जे बंडखोर आहेत ते थेट शरद पवारकडे जाऊन शरद पवारांचं काम करू शकतात अजूनही अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत तळागाळाचे हे शरद पवारांना आपला नेताच मानतात ते शरद पवारांना वेगळं मानत नाहीत त्यामुळे अनेक जण त्यांना अजित पवारांकडे तिकीट मिळणार नाहीये ते शरद पवान कडे जातात त्यामुळे बंडकरीची चिंता अजित पवारांना नाहीये, बंडखोरीची चिंता सध्या तरी भाजपला मोठ्या प्रमाणात आहे, भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात बंडखोरी करतील यात शक्यच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठ्या धक्का बसेल.

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...