Tuesday, October 8, 2024

बरंच झालं

 

एक बरं झालं
मी राजकारणात गेलो नाही
नाहीतर....
पडला असता मुडदा
त्या घोटाळेबाजांचा
अण्
जागवल असत संसदेच्या भिंतींना
केले असते आंदोलन
अन्यायाच्या विरोधात
मग केला असता प्रहार
जातीवर
पेटवली असती मशाल
त्यांच्या बुडाखाली
जातीयतेची...
पण ते बरंच झाल
मी राजकारणात गेलो नाही
विलास खैरनार

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...