Sunday, October 6, 2024

सरकार संवेदन शुन्य झाले का ?






            

 - विलास खैरनार 

     शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची जी जखम महाराष्ट्राला झाली, त्याबद्दलचे वेगवेगळे पैलू ऐकून घेणारा ऐकून घेतल्यापण आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्या काही ना काही घटना घडतात सोमवारी दुपारी एक वाजता शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा कोलमडून पडला आणि त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या भावनांचा दर्शन महाराष्ट्रात होतं
        महाराष्ट्र संतापलेला आहे महाराष्ट्र चिडलेला आहे महाराष्ट्र दुखावलेला आहे, घडलेल्या सगळ्यात नवी घटना म्हणजे मुख्यमंत्री यांनी जवळजवळ 96 तासानंतर का होईना शिवाजी महाराजांचा हा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात पडल्याबद्दल आज जाहीर दिलगिरी व्यक्त केली त्यांनी जाहीर माफी मागितली
         खरंतर एकदाथ शिंदेंनी हे पूर्वीच करायला पाहिजे परंतु राजकारणाच्या सगळ्या गदारोळामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं नाही किंवा ते इतके निर्बल झाले आहेत की महाराजांचा पुतळा पडला की आपण काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि नेहमीच्या पद्धतीने त्यांनी आरेला कारे करणे सुरू केलं आणि सगळ्या गोंधळ झाला तुमच्या लक्षात असेल मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या जबाबदारीचा भाग न राहता पुतळा पडला याचा सगळा दोष हा वेगवान वाऱ्यावर ढकलेला होता आहे, पुतळा का पडला कशामुळे पडला याचा शोध न घेता मुख्यमंत्र्यावरच्या पदावरच्या माणसाने अशा प्रकारे काहीही बेजबाबदारपणे जाहीर करणं हे राज्यकर्त्याला साधेच नाही ते त्यांनी केलं
       त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वाऱ्याला दोष दिला आता जवळजवळ चार दिवसानंतर या सगळ्यांचे डोकं ठिकाणावर आले, पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींनी या सर्वांचे कान ओढलेले आहे ते लक्षात घ्या जोपर्यंत दिल्लीहून आदेश येत नव्हता हे काहीच करत नाहीत तेव्हा तोपर्यंत जोपर्यंत वरतून काही सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांची डोकी चालत नाही अशातला प्रकार आहे बाकी नाही.
      खरंतर शिवाजी महाराज एवढे मोठे दैवत आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इजा झाली की आपण काय करायला पाहिजे काय मलमपट्टी करायला पाहिजे काय जनतेच्या भावनांवर उपचार करायला पाहिजेत हेही यांना कळलं नाही सरकार इतके संवेदन शुन्य झाले का ?
     राज्यकर्त्यांनी माफी मागितली तरी सुद्धा ही माफी प्रामाणिक आहे असं महाराष्ट्रातली जनता मानेल असं मला वाटत नाही मला स्वतःलाही ही माफी प्रामाणिक वाटत नाही. आधीच खर्च केलेले करोड रुपये हे जनतेचे पैसे आहेत ते पूर्णपणे फुकट घालवले, यांना काहीही वाटत नाही. एवढा निगरगट्टपणा संवेदन शुल्यता यातून रोजच दिसतेय, रोज ही संवेदन शुन्नता दिसते तरी महाराष्ट्रातल्या जनतेचे मन शांत होणार नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रक्षण जे करू शकत नाही ते माफी कसली मागतात, त्यांनी तर सत्तेतून राजीनामा द्यायला हवा बस.

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...