Sunday, October 13, 2024

शब्द


कविता लिहितांना
मनात विचारांची बहर येते
ह्दयाच्या दरवाजावर
शब्दांची थाप पडते

शब्दांच पाखरू
मनात असं झेप घेतं
विचारांच्या वादळाला
जसं आकाश उडवून नेतं

वा-या सारखे येतात
मनाला छळत बसतात
जाताना मात्र कविता
तयार करून जातात
-विलास खैरनार

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...