मनात विचारांची बहर येते
ह्दयाच्या दरवाजावर
शब्दांची थाप पडते
शब्दांच पाखरू
मनात असं झेप घेतं
विचारांच्या वादळाला
जसं आकाश उडवून नेतं
वा-या सारखे येतात
मनाला छळत बसतात
जाताना मात्र कविता
तयार करून जातात
-विलास खैरनार
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment