Sunday, October 13, 2024

तुला पण असंच होतं?




फक्त आठवण आली तरी
मन वा-यासारखं डोलतं
तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत
मग मनाला वाटतं
भेटावं एकदा तरी
मन तेव्हा सैरभैर होतं
अट्टाहास करत
तुझा आणि तुझ्या आवडींचा
अस वाटतं की
सतत तुझ्याशी बोलतं रहावं
पण काय बोलावं
काहीच सुचत नसतं
काळीज तेव्हा फक्त धडधडतं
सांग ना
तुला पण असंच होतं...?
-विलास खैरनार

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...