Sunday, October 13, 2024
तुला पण असंच होतं?
फक्त आठवण आली तरी
मन वा-यासारखं डोलतं
तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत
मग मनाला वाटतं
भेटावं एकदा तरी
मन तेव्हा सैरभैर होतं
अट्टाहास करत
तुझा आणि तुझ्या आवडींचा
अस वाटतं की
सतत तुझ्याशी बोलतं रहावं
पण काय बोलावं
काहीच सुचत नसतं
काळीज तेव्हा फक्त धडधडतं
सांग ना
तुला पण असंच होतं...?
-विलास खैरनार
Subscribe to:
Post Comments (Atom)
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
-
- विलास खैरनार भाजपच्या १०५ आमदारांना माहिती आहे , पार दिल्लीत बसलेल्या मोदी शहाणा पण माहिती आहे भाजपवाले सध्या शिंदेंना ढिल देत आहेत,...
-
- विलास खैरनार कॉलेज मधून धावपळ करत मी बस स्थानकावर पोहोचलो तर कळलं की गाडी एक तास उशिरा येणार आहे म्हणजे दुपारच्या एक ...
-
तिचा प्रत्येक शब्द मला खरा वाटला स्वप्नात मी तिच्यासोबत संसार मांडला पण एकदा जवळ येऊन ती हळूच म्हणाली विसर वेड्या मी तर सहज टाईमपास केला अन...
No comments:
Post a Comment