Sunday, October 13, 2024
तुला पण असंच होतं?
फक्त आठवण आली तरी
मन वा-यासारखं डोलतं
तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत
मग मनाला वाटतं
भेटावं एकदा तरी
मन तेव्हा सैरभैर होतं
अट्टाहास करत
तुझा आणि तुझ्या आवडींचा
अस वाटतं की
सतत तुझ्याशी बोलतं रहावं
पण काय बोलावं
काहीच सुचत नसतं
काळीज तेव्हा फक्त धडधडतं
सांग ना
तुला पण असंच होतं...?
-विलास खैरनार
Subscribe to:
Post Comments (Atom)
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
-
भांडण आज जोराचे भांडण झाले तिचं आणि माझं प्रश्न अन् उत्तरांनी तुफान राडा केला वर्ष भराच्या रागाचा वर्षाव तिथे झाला शब्दाला शब्द भिणला भावन...
-
बस एक नजर तुझी माझ्या नजरेत भिडावी तुझ्या माझ्या मिलनाची साक्ष द्यावी माझ्या हास्याची जादू तुझ्या चेह-यावर दिसावी माझ्या शब्दांनी तुझी ओंज...
No comments:
Post a Comment