Sunday, October 13, 2024

तुला पण असंच होतं?




फक्त आठवण आली तरी
मन वा-यासारखं डोलतं
तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत
मग मनाला वाटतं
भेटावं एकदा तरी
मन तेव्हा सैरभैर होतं
अट्टाहास करत
तुझा आणि तुझ्या आवडींचा
अस वाटतं की
सतत तुझ्याशी बोलतं रहावं
पण काय बोलावं
काहीच सुचत नसतं
काळीज तेव्हा फक्त धडधडतं
सांग ना
तुला पण असंच होतं...?
-विलास खैरनार

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...