Sunday, October 13, 2024

उद्रेक


उद्रेक भावनांचा
मनात दडलेल्या कल्लोळाचा...
उद्रेक विचारांचा
समाजातल्या अस्मितेचा...

तेथील दडलेल्या
संस्कृतीचा....
माणसांनी पेरूण
ठेवलेल्या अंतराचा...

उद्रेक जल्लोषाचा
मेलेल्या माणूसकीचा...
संसदेच्या अर्थसंकल्पातील
मांडलेल्या गरीबीचा...

उद्रेक भक्तीचा
माणसातल्या अंधकाराचा...
अंधारलेल्या संसाराचा
माणसाच्या माणूसपणाचा...
-विलास खैरनार
०१/०९/२०२०

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...