Sunday, October 13, 2024

संघर्ष

 

आयुष्याच्या मध्यावर
उभा राहून बघतो माघारी
जीवनाच्या गराड्यात सापडलो
पुढे जाण्याची भीती
मागे सरकलो तर बनेल
जिंदगीचा शिकारी
थांबलो तिथेच तर
म्हणेल कोणी भिकारी

योग्य हेच की चालत राहणं
संकटाशी लढत राहणं
लढताना हरलो जरी
हरण्याची खंत नाही
संघर्ष माझा ध्येयासाठी
माझ्या लढाईचा अंत नाही
पुन्हा उठेल मी युध्दासाठी
शांत बसायला मी काही संत नाही
-विलास खैरनार
२९/१०/२०२०

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...